Posts

Showing posts from January, 2011

सुंदर मैत्रीचा क्षण

Image
                                            अखेर २६ जानेवारीचा दिवस उजाडला आणि एका अविस्मरणीय दिवसाचा शुभारंभ झाला. धावत पळत रिक्षाने बसने शेवटी एकदाचा शिवाजी पार्कला पोहोचलो. आणि दिसले ते अनोळखी पण ओळखीचे वाटणारे चेहरे. प्राथमिक ओळख परत एकदा झाली. वैशाली ( जिच्यामुळे मी बझ्झ जॉईन केले आणि आजचा दिवस माझ्यासाठी आला), अर्जुन, मंदार, प्राची आणि प्रणिता. मला चहा पिल्याशिवाय जमत नाही त्यामुळे प्रथम  पिला तो चहा. आणि वाट पाहत बसलो अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सेक्रेटरीची.                      प्रथम आला तो मंदार आणि त्यापाठोपाठ अतुल आणि निवी. निविला पहिले आणि माझा अंदाज खरा ठरला. ती आणि मी एकाच बस मधून आलो होतो, मी तिला स्टेशन पर्यंत फोल्लोव सुद्धा केले होते पण नंतर  विचार आला चुकून गाल सुजायाचा आणि दिवस वाया जायचा. त्यामुळे वैशू ला फोन  केला आणि गाल व्यवस्थित घेवून गेलो. आम्ही वाट पाहून फेरफटका मारायला लागलो आणि सेक्रेटरीचे आगमन झाले कल्पेश (कल्पि म्हणत नाही कारण ते नाव petented  आहे आणि त्याची roayalti  आमच्याकडे नाही). तोपर्यंत अतुलची फोटोग्राफी आणि निवी ची फास्ट लोकल  चालू झाली होतीच. म्हणत

दिवस....

येतील का ते दिवस परत ? जातील का हे दिवस मागे ? किती छान होते ते दिवस.. ज्यांना माहित नव्हती रात्र......

माझी मनी

   रात्रीचे 12 वाजून गेले होते मी अभ्यास करत बसलो होतो. अचानक बाहेरून मांजराचा भांडण्याचा  आवाज आला पण  मी दुर्लक्ष  केले, पण नंतर लक्षात आले आमचे  मनी बाहेरच होते. मी पटकन उठलो आणि  हातात जे सापडेल ते घेवून बाहेर आलो  आणि  आवाजाच्या  दिशेने फेकले. आवाज बंद झाला आणि माझा आवाज चालू  झाला. मनिला खुप हाका  मारल्या पण व्यर्थ. मी परत अभ्यास करत बसलो पण लक्ष लागत  नव्हते. २-३ वेळा बाहेर येवून पहिले पण मनी काय दिसली नाही. मी विचार करत झोपी गेलो.      सकाळी जाग  आली ती आईच्या आवाजाने. मनी कुठे आहे रात्री आत घेतली होतीस काय? मी काहीच बोललो नाही. कॉलेजला  जायच्या वेळी आई ला  रात्रीचा सर्व प्रकार सांगितला तसे आईने श्लोक वाचन केले. मी तसाच तराट  कॉलेजला  गेलो. पण लक्ष लागत नव्हते.     दुपारी दांडी मारून घरी आलो तर घराचे वातावरण गंभीर. मनीची  चौकशी केली तर ते एका कोपर्यात शांत पडलेले. आईला विचारले : कधी आले आई : आले नाही जावून आणले मी : कोठे होते? आई : शेजारी विटेच्या थाप्पीवर होते. मी : जास्त लागले नाही ना? आई : त्याचे पोट फाडले आहे. मुंग्या  झाल्या  होत्या  त्या काढल्या मी : त्याला दवा

आठवण

       रात्रीचे १२ वाजत आले तसे त्याच्या ह्रुदयाचे ठोके वाढू लागले, बैचेनी वाढु लागली आणि एकदाचे १२ वाजले. SMS अणि कॉल चालू झाले त्याला वाढदिवसाच्या  शुभेच्या देण्यासाठी. पण त्याला हवा असलेला SMS किंवा कॉल येत नव्हता त्यामुले तो अधिकच बैचेन होत होता. तो वाट पाहत पाहत कधी झोपी गेला ते त्यालापण  कळालेच नाहि.             सकाळी जाग आली आणि प्रथम त्याने मोबाइल हातात घेवुन INBOX चेक केले, मिस कॉल चेक केले एखादा अनोळखी   नंबर दिसला तर लगेच त्याला कॉल लावला पण सर्व  व्यर्थ. दिवसभर त्याने मोबाइल एक मिनट पण दूर केला नाहि. एवढ्या  आनंदयाच्या दिवशी तो पूर्ण दिवसभर निराशाच राहिला. दिवस संपत आला तसे तो हेही विसरून गेला की आज त्याचा वादादिवास होता. रात्रि जोप्ताना त्याच्या मनात विचार आला....        एवढे सोपे असते का एखाद्याला विसरणे. प्रत्येक क्षण आपण ज्या व्यक्तीसाठी जगलो त्या शिवाय दुसर्या कशाचाही विचार केला नाही ती व्यक्ती आपणाला इतक्या सहज सहजी विसरू शकते ? चुका तर सर्वाकडून  होतात पण प्रेमात तर सर्व  माफ असते ना मग असे का? त्याने कधीच तिचे ऐकले नव्हते असे नाही पण त्यावेळी त्याने ऐकले कोणताही म

आठवण

का येते तुझी आठवण प्रत्येक क्षणाला प्रत्येक दिवशी झालो जरी दुसर्याचा तरी तूच आहेस माझे हृदय

दुरापास्त

तुला पाहण्यासाठी मैलोन मैल आलो तुझा आवाज ऐकण्यासाठी रात्र रात्र जागलो मग का असा दिवस यावा तुझा आवाज आणि दिसणे दुरापास्त व्हावे जरी झाली असलीस दुरापास्त तरी आवाज आहे कानात आणि चेहरा आहे डोळ्यात