Posts

नाती ..naati

नाती ....   किती सोपे शब्द आहेत नाती! पण आपले जीवन अपूर्ण आहे या शब्दांशिवाय. दिवसातून म्हणण्यापेक्षा प्रत्येक तासाला आपण हेच शब्द जगात असतो. आपल्या जन्मापासून जी सुरुवात होते ती आपले जीवन संपले तरी हा शब्द आपली पाठ सोडत नाही. पण आता खरंच विचार करण्याची वेळ आली आहे, आपण खरंच जगतो का हा शब्द? काहींचे म्हणण्यापेक्षा सर्वांचे उत्तर हो हेच असणार आहे. कारण आपण या शब्दअगोदर खूप शब्द जोडले आहेत आणि या शब्दांच्या खेळात आपण आपल्या मनाचे समाधान करत असतो. उदा. मैत्रीचे नाते, विश्वासाचे नाते.. इ.     प्रत्येकाने आपल्या परस्पर सोयीने नाती या शब्दाची व्याख्या केली आहे आणि आपण तीच जगत आहोत. पहा आठवून ३०-४० वर्षांपूर्वी आपण कधी मैत्रीचे नाते, विश्वासाचे नाते असे रोज बोलत होतो का? तर नाही. आई, पप्पा, बहीण, भाऊ, आजी, आजोबा कितीतरी नाती आपणाला आपल्या समाजाने दिली आहेत त्यांनाच आपण नातलग म्हणत असू, आणि याच नात्यातून निर्माण होणाऱ्या नवीन नात्यानं आपण दूरचे नातलग म्हणत असू आणि म्हणतो हि. आता या युगात हीच   नाती आपल्यात फार राहिली नाहीत आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी आपण आपल्या सोयीप्रमाणे नवीन नात

गोड

Image
लावतो पळवून कंटाळा तुझा हसरा चेहरा तुझे गोड हास्य तुझे बोबडे बोलणे

बॉस

Image
बॉस म्हणजे बॉस असतो घरात मांजर आणि ऑफिसमध्ये वाघ असतो. एम्प्लोयी म्हणजे घराचे गडी, कंपनी म्हणजे घर असते. कोणाचाही राग कोणावरही काढ़ने हा त्याचा जन्मसिद्ध हक्क असतो. SOLUTION ला असते DIPLOMATIC उत्तर. +VE फीडबैक माझ्यामुळे -VE फीडबैक EMPLOYEE मुळे. अगदी सरळ असते यांचे गणित. वाट लागते CAREER ची पण याची नसते त्याना काळजी. भुन्कन्यासाठी  कंपनी देत असते पगार अशीच असते यांची खात्री.

जगता जगता

Image
जगता जगता विसरुनी गेलो का आहे जगत ? पोटासाठी पळता पळता विसरून गेलो नाती गोती.........

भारत एक महासत्ता ............

 भारत एक महासत्ता ............   देशात एक हि भूक बळी देवू जावू नका ..सर्वोच्च्या न्यायालयाचे सरकारला आदेश आणि त्याच दिवशी पेट्रोल ५ रु यांनी महागले.  २०२० साली भारत नक्की महासत्ता होईल पण देशात राहील फक्त आणि फक्त गरीब जनता. मग कितीही तुम्ही आधुनिक तंत्राद्यान वापरले तरी तुम्हाला कोणीही हरवू शकेल कारण उपाशी पोटी कोणी युद्ध जिंकू शकत नाही. तुम्ही जनतेला विचार त्यांना महासत्ता असणारा देश हवा आहे का? उत्तर होच असेल पण त्यांची गरज काय आहे महासत्ता कि भूक? त्यांचे उत्तर असेल प्राथमिक गरजा. ज्यांची परत एकदा आठवण करून द्यावी लागेल आपल्या भ्रष्ट  नेत्यांना आणि ती म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा.   गेल्या ९ महिन्यात पेट्रोल १८ रु नि वाढले. कच्च्या तेलातून फक्त पेट्रोल, डीझेल आणि ग्यास नाही तयार होत इतरही उत्पादने निघतात पण दर फक्त यांचेच का वाढतात? हा सगळा खेळ चालू आहे तो सर्व राजकीय पक्षांचा. पण हे  मात्र  खरे  आहे भारत हा एक महासत्ता असेल जेथे  जगातील जास्तीत जास्त श्रीमंत असतील आणि जास्तीत जास्त गरीब हि.  मनात खूप आहे पण मला आठवते ते सडक मधील गाणे...जे २०२० साली प्रत्येक भारतीय म्हणेल:

भारत देश महान

Image
 कोणी घर देता का घर ? असे म्हणत आहे रोज महासत्ता होत आहे भारत पण देशोधडीला जनता आहे लागत काळ्या पैश्याच्या फासाने मरत आहेत येथील मने येत आहेत पूर्वीचे दिवस परत गरीब, गरीब होत आहे, श्रीमंत, होतायेत श्रीमंत कोण घालेल याला आळा? जो तो आहे पैश्याच्या मागे कोणी वाली नाही उरला मोठे घर पोकळ वासा असा हा अमुचा भारत देश महान

मला हि वाटते

Image
मला हि वाटते तुझ्या आनंदात सामील व्हावे मला हि वाटे तुझ्या दु:खात सामील व्हावे पण तू का असा दुरावा केलास माझेच मला कळेना चूक होती माझी पण ती तुला हि मान्य होती वेळ निघुनी जाण्याआधी का नाही अडवलेस? मला दूर केलेस तूच पण तुझी वाट  मी पाहत होतो कितेकदा परतुनी हि आलो पण याचवेळी मी अशी का चूक केली परत न येण्याची जी निरंतर बोचत राहते क्षणाक्षणाला.