Posts

Showing posts from May, 2011

भारत एक महासत्ता ............

 भारत एक महासत्ता ............   देशात एक हि भूक बळी देवू जावू नका ..सर्वोच्च्या न्यायालयाचे सरकारला आदेश आणि त्याच दिवशी पेट्रोल ५ रु यांनी महागले.  २०२० साली भारत नक्की महासत्ता होईल पण देशात राहील फक्त आणि फक्त गरीब जनता. मग कितीही तुम्ही आधुनिक तंत्राद्यान वापरले तरी तुम्हाला कोणीही हरवू शकेल कारण उपाशी पोटी कोणी युद्ध जिंकू शकत नाही. तुम्ही जनतेला विचार त्यांना महासत्ता असणारा देश हवा आहे का? उत्तर होच असेल पण त्यांची गरज काय आहे महासत्ता कि भूक? त्यांचे उत्तर असेल प्राथमिक गरजा. ज्यांची परत एकदा आठवण करून द्यावी लागेल आपल्या भ्रष्ट  नेत्यांना आणि ती म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा.   गेल्या ९ महिन्यात पेट्रोल १८ रु नि वाढले. कच्च्या तेलातून फक्त पेट्रोल, डीझेल आणि ग्यास नाही तयार होत इतरही उत्पादने निघतात पण दर फक्त यांचेच का वाढतात? हा सगळा खेळ चालू आहे तो सर्व राजकीय पक्षांचा. पण हे  मात्र  खरे  आहे भारत हा एक महासत्ता असेल जेथे  जगातील जास्तीत जास्त श्रीमंत असतील आणि जास्तीत जास्त गरीब हि.  मनात खूप आहे पण मला आठवते ते सडक मधील गाणे...जे २०२० साली प्रत्येक भारतीय म्हणेल:

भारत देश महान

Image
 कोणी घर देता का घर ? असे म्हणत आहे रोज महासत्ता होत आहे भारत पण देशोधडीला जनता आहे लागत काळ्या पैश्याच्या फासाने मरत आहेत येथील मने येत आहेत पूर्वीचे दिवस परत गरीब, गरीब होत आहे, श्रीमंत, होतायेत श्रीमंत कोण घालेल याला आळा? जो तो आहे पैश्याच्या मागे कोणी वाली नाही उरला मोठे घर पोकळ वासा असा हा अमुचा भारत देश महान